शुक्रवार, २७ डिसेंबर, २०१३

जीवनदायी’ योजनेचा संभ्रम कायम



केंद्र सरकारने कार्यान्वित केलेल्या राजीव गांधी जीवनदायी योजनेच्या अंमलबजावणीचा संभ्रम अजूनही घाटी हॉस्पिटलमध्ये कायम आहे. ९७२ विकारांवर उपचार करण्यासाठी कोणते निकष आहेत? रुग्णांची नोंदणी कशा पद्धतीने करायची? आलेल्या अडचणी दूर कशा करायच्या याचा संभ्रम प्रशासनासमोर आहे.

घाटीमध्ये गेल्या वर्षीपासूनच नांदेड जिल्ह्यामधून राजीव गांधी जीवनदायी योजनेचे पेशंट येणे सुरू झाले आहे. मात्र ही संख्या तुरळक होती. मदतीसाठी आरोग्यमित्र, नोंदणीसाठी डाटा एंट्री ऑपरेटर आणि वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली होती. आता राज्यभर ही योजना लागू झाल्याने रुग्णांची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे घाटी प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. त्यात कॅन्सर हॉस्पिटलमधील रुग्णसंख्येची भर पडली आहे. पूर्वी राजीव गांधी योजनेसाठी कॅन्सर आणि घाटीसाठी कॉमन कर्मचारी नेमले होते. आता दोन्हीकडची गर्दी वाढल्याने दिवसभरात रुग्णांची नोंद होण्यासाठीच तासनतास वाट पाहावी लागत आहे. अशीच परिस्थिती राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये झाली आहे. याची दखल घेऊन मुख्य सचिवांनी गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्स बोलावली आहे. राज्यातील १४ शासकीय मेडीकल कॉलेजचे डीन उपस्थित राहणार आहेत. त्याद्वारे अनेक अडचणी दूर होण्याची शक्यता आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here...